धावडा परिसरात मिरचीचे पीक बहरले

प्रतिनिधी मजहर पठाण, धावडा भोकरदन
दरवर्षीपेक्षा लागवड घटल्याने यंदा मिरचीच्या भावात 50 ते 60 रुपयाच्या भावाने तेजी
भोकरदन : तालुक्यातील धावडा व परिसरात एप्रिल – मे महिन्यात ठिबक सिंचन वर मल्चिंग कापड चा वापर करून लागवड करण्यात आलेली मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात बहरल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापासूनच मिरचीच्या भाववाढ झाली असून सध्यातरी मार्केटमध्ये ज्वेलरी मिरची 35 ते 40 रुपयाचा भाव व बारीक मिरची 50 ते 60 रुपयाचे भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना आणखी प्रतीक्षा वाढली आहे. धावडा आणि वालसावंगी हे गाव भोकरदन तालुक्यातील सर्वात मोठे मिरची लागवडीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध असल्याने परिसरात दरवर्षी वीस ते पंचवीस हजार हेक्टरवर मिरचीची लागवड केली जाते. परंतु सध्या मिरचीची आवक कमी असल्याने भावात चढ-उतार सुरू आहे त्यामुळे आठवडाभरात मिरचीची आवक वाढणार असून भाव चटकणार आहे. त्यामुळे परिसरातील धावडा वालसावंगी पारध, पिंपळगाव रेणुकाई, अन्वा, जळगाव सपकाळ, शेलुद, लिहा, वडोदतांगडा, आदी भागात मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून मिरची पिकावर चुरडा मुरडा रोगाचा प्रादुर्भाव पडला त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मिरची लागवडी पासून धास्ती धरून मिरची लागवडीकडे दुर्लक्ष केले त्यामुळे भोकरदन तालुक्यात दुपटीने मिरची लागवड घटली परंतु मिरचीचे भाव अचानक वाढत असल्याने मिरची लागवड शेतकऱ्यांना अच्छे दिन येणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या तरी मिरची महाराष्ट्रातील विविध भागातील जिल्ह्यात ट्रान्सफर होत आहे. मिरचीला ट्रान्सफर साठी बाहेर राज्यात ट्रान्सफर झाला तर मिरची आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, साठी जाणार असून मिरचीच्या भावात चटक येणार आहे. सध्या तरी मिरचीला 50 ते 60 रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकरी शेतकऱ्यांचा खर्च निघेल अशी अपेक्षा शेतकऱ्यातून व्यक्त केली जात आहे.
“सध्या तरी मिरची मार्केटमध्ये मिरचीची आवक कमी असल्याने बारीक मिरचीला 50 ते 55 रुपये भाव मिळत आहे. मिरचीची आवक वाढल्यास भावात तेजी राहणार आहे. यावर्षी मिरचीची दुपटीने लागवड घटली असून भाव शेवटपर्यंत तेजितच राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मिरची मालाची काळजी घेणे गरजेचे आहे” : गुफरान सुलेमान शेख
मिरची व्यापारी धावडा यांनी सांगितले.