तळागाळातील जनतेला बाबासाहेबानी सन्मान मिळवून दिला : गुलाबराव वाघ

धरणगाव प्रतिनिधी / विनोद रोकडे
धरणगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक जवळ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी श्री वाघ हे बोलत होते त्यानी आपल्या मनोगतात, देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, कायदा, शैक्षणिक, संस्कृतिक, विद्युत, जल, कृषी, स्त्रीउद्धार, कामगार, शेतकरी, औद्योगिकीकरण, दलितोद्धार अशा अनेक क्षेत्रात अतुलनिय योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताचे जनक असेही संबोधिले जाते.
भारताच्या आंतराराष्ट्रीय सर्वेक्षणात स्वातंत्र्यानंतर सर्वात महान भारतीय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी घोषित झालेले आहेत. कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या शिर्ष १०० विद्वानांची यादी तयार तयार केली त्यात त्यांनी प्रथम स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठेवून त्यांना जगातला नंबर १ महाविद्वान म्हणून त्यांचा गौरव केला. इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाने गेल्या १० हजार वर्षांमधील जगातल्या सर्वांत प्रभावशाली १०० विश्वमानवांची यादी प्रकाशित केली, त्यात चौथ्या स्थानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर प्रथमस्थानावर बुद्धांचे नाव होते. प्रचंड कुशाग्र बुद्धीमत्ता, प्रगाढ विद्वता, तल्लख स्मरणशक्ती असलेले बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानक्षेत्रातील तब्बल ६४ विषयांवर प्रभुत्व (मास्टरी) होते, एवढ्या साऱ्या विषयांवर प्रभुत्व असणारे जगाच्या इतिहासातील ते प्रथम व एकमेव व्यक्ती आहेत, असे मत शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी व्यक्त केले,
तसेच माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी यांनीडॉ. आंबेडकर हे महान बोधिसत्व आहेत, ही बौद्ध धर्मातील सर्वोच्छ उपाधी त्यांना नेपाळमध्ये इ.स. १९५४ मध्ये संपन्न झालेल्या जागतिक बौद्ध धर्म परिषदेसाठी आलेल्या बौद्ध भिक्खूंनी प्रदान केली होती. त्यानंतर इ.स. १९५५ मध्ये दलाई लामा बाबासाहेबांना भेटले तेव्हा लामांनी त्यांना बोधिसत्व संबोधले होते. जातिव्यवस्थेविरूद्ध प्रखर संघर्ष, महान भारतीय संविधान निर्माण अशा अनेक अतुलनीय देशसेवेसाठी दिलेल्या योगदानामुळे इ.स. १९९० साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील कोट्यवधी शोषित, पीडित, क्रांतीकारी व मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान झालेले आहेत. बाबासाहेबांचा जन्मदिवस भीम जयंती किंवा आंबेडकर जयंतीसुद्धा जगातल्या ६५ पेक्षा अधिक देशांत दरवर्षी साजरी केली जाते असे मत निलेश चौधरी यांनी व्यक्त केले यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मरकास अभिवादन करण्यासाठी शहर प्रमुख भागवत चौधरी , युवासेना उपजिल्हा प्रमुख हेमंत महाजन, युवासेना शहर प्रमुख परमेश्वर महाजन, बापू महाजन नगरसेवक किरण मराठे , भरत शिरसाठ, रमेश चव्हाण, विनोद रोकडे , रणजित सिकरवार,किरण अग्निहोत्री, भीमराव धनगर, भूषण शिरसाठ, प्रेमराज चौधरी, रवी अहिरे, गोपाल पाटील, सह भीमसैनिक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.