ताज्या बातम्या

धरणगांवातील अवैध धंद्याना कुणाचे पाठबळ ? रावसाहेब बापू यांचा सवाल !

धरणगांव – शहरात तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात खुलेआम अवैध धंद्यांचा सुळसुळाट आहे. सट्टा, पत्ता, दारू टपऱ्या – टपऱ्या वर खुले आम विक्री केली जाते. या धंद्यांना कुणाचे पाठबळ आहे. असा सवाल करीत अवैध धंदे बंद करण्यात यावेत अशी मागणी रावसाहेब बापू यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

धरणगांव शहर आणि तालुक्यात अवैध धंदे काही नवीन नाहीत. याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. वेळोवेळी शहरातील तसेच तालुक्यातील अवैध धंदे बंद व्हावेत अशी मागणी सुज्ञ नागरिक करीत असतात. मात्र यावर २-४ दिवस कारवाई होते अन् पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’ नुसार पुन्हा धंदे पूर्ववत होतात. यावर वरदहस्त असल्याशिवाय हे धंदे सुरूच राहू शकत नाहीत. असा प्रश्न उपस्थित करीत सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब बापू महेंद्र पाटील यांनी निवेदनाद्वारे हे अवैध धंदे बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सदर निवेदन पोलिस स्थानक, तहसीलदार यांनाच नव्हे तर खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना देखील दिले आहे.

याबाबत त्यांनी, “आपले पालक असलेल्या मंत्र्यांना निवेदन देवून ७ – ८ दिवस झाले तरी देखील खुलेआम अवैध धंदे सुरूच असल्याचे म्हणत यावर वरदहस्त कुणाचा ?” असा प्रती प्रश्नच उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *