ताज्या बातम्या

धरणगांव येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात संपन्न

धरणगांव प्रतिनिधि / विनोद रोकडे

स्वामींनी दिधला हा वर I जो भावे वाचील हे चरित्र I त्यासी आयुरारोग्य अपार I संपत्ती संतती प्राप्त होय I त्याची वाढो विमल कीर्ती I मुखी वसो सरस्वती I भवसागर तरोन अंती I मोक्षपद मिळो त्या I अंगी सर्वदा विनय वसो I वृथाभिमान तो नसो I सर्व विद्यासार गवसो I भक्त श्रेष्ठ लागुनी I

धरणगाव. येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे परमपूज्य गुरुमाऊलींच्या अण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वाद व मार्गदर्शनाने दिनांक 31 मार्च 2025 सोमवार रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 8 वाजता भूपाळी आरती तदनंतर सामुदायिक श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक व श्री दुर्गा सप्तशती पाठ श्री राम रक्षा स्तोत्र श्री हनुमान चालीसा पठण श्री स्वामी समर्थ मंत्र जप दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नामस्मरण. सकाळी 10.30 वाजता मांदीयाळी साठी सेवेकर्‍यांनी आणलेले डबे एकत्र करून गोपाळकाला करून महाराजांना नैवेद्य दाखवण्यात आला व आरती करण्यात आली.

कुणाल ठाकरे यांनी स्वामी समर्थ मार्ग विषयी मार्गदर्शन केले त्यात. भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरिता अनेक विविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रेय हा अवतार जगाचे गुरुपत घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इ.स.1149 मध्ये छेली खेडे या गावात पंजाबमधून प्रकट होऊन भगवान श्री दत्तात्रयांनी आगळावेगळा बुद्धीला अगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्ष श्री स्वामी समर्थ महाराज अखिल विश्वामध्ये चीन मलाया या सिंगापूर व संपूर्ण भारतभर बभ्रमण करीत होते. इ.स 1378 मध्ये पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्रीवल्लभ हे नवीन नामाभिमान धारण करून सुमारे 150 वर्षे अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. ही इ.स.15 28 मध्ये कारंजा विदर्भ महाराष्ट्र येथून श्री नृसिंहसरस्वती या अवतारात सुमारे 100 वर्ष कार्य केले. याच काळात औदुंबर वाडी गाणगापूर यासारखे महान तीर्थक्षेत्र तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली इ.स.1678 मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ हा अवतार धारण केला. इ.स.1856 मध्ये अक्कलकोट मध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्ष आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो जो भेटेल त्याला दुःख मुक्त करून स्वयंभू बनविले.अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योगक्षेमाची हमी दिली. इ.स.1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिक दृष्ट्या देह संपविला. परंतु आपल्या सुदैवाने त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने किंबहुना त्यापेक्षा सहस्त्रपट वेगाने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवामार्गातून सुरू आहे. हा मार्ग गुरुप्रणित मार्गावर अधिष्ठित आहे. जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवितो. त्याचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतीमय बनवितात. श्री स्वामी समर्थ महाराज एक शक्ती व तत्व असून श्री स्वामी समर्थ हा शक्तिमान मंत्र आहे. म्हणून प्रत्येक सेवेकऱ्याने रोजच्या नित्यसेवेत 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमशः 3 अध्याय वाचून सात दिवसात पारायण पूर्ण करावे .
कार्तिक मोरे यांनी गुरुमाऊली कोण आहेत व गुरुमाऊलींचे कार्य किती वेगाने सुरु आहे व श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग मुख्य गुरुपीठ येथे दर महिन्याला होणारे मासिक मीटिंग तसेच दर महिन्याला होणारे पारायण भैरव चंडी सेवा याविषयी माहिती दिली. तसेच गुरुकुल पीठ त्र्यंबकेश्वर येथे 1000 बेडचे मल्टीस्पेशलिस्ट सद्गुरु मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल चे बांधकाम सुरू आहे त्यात भाविक सेवेकर्‍यांनी देणगी पावतीच्या स्वरूपात आर्थिक मदत करावी असे या वेळेस आवाहन करण्यात आले तसेच श्री स्वामी समर्थ सेवा मासिक सभासद नोंदणी अभियान सुरू आहे त्यात सहभाग घ्यावा.
13 एप्रिल 25 रोजी स्वामी समर्थ केंद्र धरण गाव येथे सिद्ध मंगल पादुका पूजन होणार आहे त्याची नावे नोंदवावी असे याप्रसंगी आवाहन करण्यात आलेले आहे तसेच 20 एप्रिल ते 26 एप्रिल श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नामजप सप्ताह होणार आहे त्याचबरोबर पारायणासाठी बसणाऱ्या भाविकांनी नावे नोंदवावी व त्या अखंड नामजप यज्ञ सप्ताहाची थोडक्यात रूपरेषा सांगितली. दुपारी 12.30 वाजता सर्व भाविक सेवेकर्‍यांनी महाप्रसाद घेतला व प्रकट दिनानिमित्त मांदियाळी उत्साहात साजरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *