भवरखेडा सरपंचपदी रेखाबाई विजय सुर्यवंशी यांची बिनविरोध निवड ; धोबी समाजातर्फे करण्यात आला सत्कार

धरणगाव प्रतिनिधि / विनोद रोकडे
धरणगांव – तालुक्यातील भवरखेडा ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी रेखाबाई विजय सूर्यवंशी (धोबी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. रेखाबाई सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आपला आनंद साजरा केला.
भवरखेडा ग्राम पंचायतीच्या सरपंच सुनीता उगलाल पाटील यांनी आपसात ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी भवरखेडा कार्यालयात सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी रेखाबाई सूर्यवंशी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी यांनी रेखाबाई सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी ग्रामपंचायत भवरखेडा ग्रामसेवक, आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच पदी निवड जाहीर झाल्या नंतर गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढत रेखाबाई सूर्यवंशी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
समाज पंच मंडळाने केले स्वागत
तसेच यावेळी धरणगाव तालुक्यातील परीट धोबी समाजाचा पंच मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी समाजाचे जेष्ठ नेते हिरामण जाधव, जिल्हा उपाध्यक्ष छोटू भाऊ जाधव , युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रवी जाधव , धरणगाव शहर समाज अध्यक्ष गणेश जाधव, भवरखेडा येथील पहेलवान अर्जुन सूर्यवंशी, कैलास सोनवणे, समाज बांधव उपस्थित होते.
गावकऱ्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ न देता गावच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया यावेळी नवनिर्वाचित सरपंच रेखाबाई सूर्यवंशी यांनी दिली आहे.