ताज्या बातम्या

भागवत आप्पा चौधरींचे उपोषण प्रशासनाकडून मागण्या मान्य करत सोडवले

धरणगांव प्रतिनिधि / विनोद रोकडे

धरणगाव: निकृष्ट कामाविरोधात आमरण उपोषणाला बसलेले भागवत आप्पा चौधरी यांच्या मागण्या अखेर प्रशासनाने मान्य केल्या. धरणगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी चौधरींना रस पाजून उपोषण सोडवले.

यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, उद्योजक तथा माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष व युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी, विधीतज्ञ शरद माळी, संघटक राजेंद्र ठाकरे, जितेंद्र धनगर, किरण मराठे, भीमराव धनगर, संतोष सोनवणे, गजानन महाजन, विनोद रोकडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

  • भागवत आप्पा चौधरी यांनी धरणगाव नगरपरिषदेतील काही कामांच्या निकृष्ट दर्जाबाबत तक्रार केली होती.
  • या तक्रारीवर योग्य कारवाई न झाल्याने त्यांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता.
  • प्रशासनाने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर त्यांनी उपोषण सोडले.
  • या घटनेमुळे धरणगाव नगरपरिषदेतील कामकाजावर नागरिकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *