दुर्दम्य प्रतिष्ठानची रुग्णवाहिका रुग्णांसाठी धावली एक लाख किलोमीटर !

धरणगांव प्रतिनिधि / विनोद रोकडे
धरणगांव – येथील ‘सेवा परमो धर्म ,सेवा धर्म सुखाव: या ब्रीदवाक्य प्रमाणे सेवाकार्य करीत असलेल्या दुर्दम्य प्रतिष्ठानच्या रुग्णवाहिका दोन वर्षात एक लाख किलोमीटर धावली. निस्वार्थ सेवाभाव ठेवणे हाच यशस्वी जीवनाचा मूलमंत्र आहे. निस्वार्थतेने केलेल्या सेवेचे समाजाला एक नवी दिशा देण्याचे कार्य होत असते.गेल्या तीन-चार वर्षांपासून दुर्दम्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सेवा कार्य केली जात आहेत. प्रतिष्ठानची एक ओमनी रुग्णवाहिकाही आहे. प्रत्येकाचा जीवनप्रवास जन्मापासून मृत्यूकडे असतो, तर रुग्णवाहिकेतील रुग्णाचा प्रवास मृत्यूकडून जगण्याकडे असतो. प्रतिष्ठानची रुग्णवाहिका सेवा रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा प्रदान करतात, प्रथमोपचार प्रदान करून आणि रुग्णाची स्थिती स्थिर करून रुग्णालयात त्वरित पोहोचवते. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत वेळ फार महत्त्वाची असते.अशावेळी असलेल्या दुर्दम्य प्रतिष्ठानची अद्यावत ऑक्सीजन सिलेंडरयुक्त रुग्णवाहिका सेवा रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा प्रदान करते. प्रथमोपचार प्रदान करून आणि रुग्णाची स्थिती स्थिर करून रुग्णालयात त्वरित पोहोचवते. वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत वेळ फार महत्त्वाची असते. दोन्ही रुग्णवाहिकांच्या माध्यमातून अनेक रुग्णांना सेवा देण्याचे काम चालक श्री नानाभाऊ बागुल, श्री प्रकाश भाऊ मराठे, श्री लोकेश भाटिया व गणेश गुरव करीत असतात. धरणगाव परिसरात अपघात झाल्यास तसेच तत्काळ रुग्णांना जळगाव, नाशिक, पुणे, मुंबई येथे न्यावयाचे असल्यास अतिशय अल्प दरात प्रतिष्ठानची रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध होते. आपल्या दुर्दम्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असलेल्या रुग्णांच्या सेवेबद्दल अध्यक्ष श्री कैलास माळी सर, सचिव श्री मंदार भाऊ चौधरी, उपाध्यक्ष श्री संतोष भाऊ सोनवणे व संचालक मंडळाने समाधान व्यक्त केले व भविष्यातही रुग्णांना सुसज्ज अशी सेवा देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. यासाठी सर्व संचालक मंडळाचे सहकार्य व अर्थिक योगदान देत असतात. परिसरात कुठेही रुग्णवाहिकेची गरज लागल्यास संपर्क साधण्याचे आवाहन दुर्दम्य प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.